Posts

नाजुक कळी ‌वारा आला सळसळून गेला,  एका नाजुक कळीला दुःखावून..... ‌दुःखात भर टाकित तिच्या, भवराहि आला नि त्रुप्त झाला तिचा रस पिऊन... ‌ह्रिदय कळिचे इवलेसे, झाले ती दुःखी,  परी करे  सगळ्यांंना  सुगंध देवूनी आनंदी....
पर्णसावली एक उंच स्त्रि भासे असे नटले हे झाडं घेऊनी पदर हिरवा देई मायेचा गारवा पाठीवर पसरे केस अशी पसरे पर्णसावली देत सौख्याचा आनंद  म्हणे मी ही हसलेली लोक होती घर्माने ओले मला तर थंडीत घाम पाझरे अशी हि हिसका मारूनी छिडकारे मोह मणी सारे या मोह मण्यात भिजूनी घे आनंद स्वास्थ्याचा हो ताजातवाना, देई श्वास विश्वाचा तोच विश्वासाचा..
तु सोनुली तु सोनुली, तु गोडुली... तुझ्या आगमनाने ही सारी नाती बदलली... आजवर फक्त मुलगी असलेली ती बायको,  मायाळू आई झाली.. फक्त मजेत नि मस्तीत जगणारा तो नवरा,  जबाबदार बाप झाला.. मध्य वयीन असलेली, तरिही तारूण्य मिरवणारी ती सासू,  आजी झाली... चश्मा म्हातारपणं दाखवतो म्हणुन चश्मा न लावता पेपर वाचणारे, ते सासरे आजोबा झाले.. मी घरात शेंडेफळ म्हणुन माझेच सगळ्यांनी एकावे,  असे सांगणारी ती खट्याळ बहीण, आत्या झाली.. सतत रुबाबात असणारा तो दादा,  आता मामा झाला... ताई-ताई करत हे ना ते मागणारी, ती साळी  आता मावशी झाली.... अशा या इवल्याश्या परिने सगळ्या नात्यांना नविन परिभाषा दिली, नि सारी नती अधिकच घट्टपणे विणली...
तु जेव्हा अनब्लाँक करशील मला.... जेव्हा तु अनब्लाँक करशील मला, तुझ्या इनबाँक्स मधे मेसेजेस चा पाऊस पडलेला असेल... कदाचीत तेव्हा तु अर्ध्या वयात असशील... मग तुला वेळ नसल्याने तु ते तसेच वाचायचे सोडुन देशील, मनात माझी गोड आठवण जपून नि बायकोपासुन लपवून.... मग बायकोच्या भितीने परत ब्लाँक करशील नि पुढचं आयुष्य जगु लागशील.... एके काळी कधीतरी आयुष्याच्या संध्याकाळी, कोणीच सोबत नसतांना तुला परत माझी आठवण होइल,  मग परत तु त्या नंबर मधे डोकावशील जो कधी काळी तु ब्लाँक केला होतास... आता तु तो अनब्लाँक करशील नि सुरवातीपासुन शेवटर्पंत वाचुन काढशील... मग तुला कळेल माझं तुझ्यावर खर प्रेम होतं, पण तुला कधी ते उमजलच नाही.... मग सांगशील तुझ्या पुढच्या पिढ्यांना... हो तेव्हा त्या तुझ्या पुढच्या पिढ्या असतील ज्याची स्वप्न तु माझ्या सोबत रंगवली होती कधीतरी .... पण आता त्यात मी कुठेच नसेन... मग सांगशील तुझ्या नातवंडांना, होती माझ्यावर जीव ओवाळून टाकणारी एक वेडी... जिने बघा काय ही प्रेमाची किमया केली..... इनबाँक्स बघताना कळेल तुला की सुरवातीला मेसेजेसची गंगा भरुन-भरुन वाहिली
एक क्षण....🌄 एका क्षणी मी डोकवित होते, निरखीत होते अवकाशी, तेथे दिसले अलौकिक, अनमिक नि आल्हाददायी सौंदर्य... बहरली होती एक सुं$दर छटा रंग होता तिचा सुंदर सावटा लाल, नीळा नि पिवळा दाटा चहुं दिशांना पसरल्या होत्या सोनेरी लाटा... ही सारी किमया त्या नारायणाची जो चालला होता घ्यावया विश्रांती कामाचे संपवुनी तास तो जाहला आनंदी अन् त्याचा किरण-किरण मावळू लागला सहजगणी... नारायणाने चातुर्य दाखविले जाता जाता त्याचे सप्तरंग हिरावून घेतले नि हळुहळू आकाश काळोखात बुडाले तेव्हा ते सप्तरंग सावळ्या रंगात बदलले... पण ...तरिही हा प्रवास इथेच थांबला नाही पुन्हा एका नव्या क्षणी तोच आनंद मी नव्याने लुटला...🤗
समाज समाज हा चांगल्याचा-वाईटाचा, सुखाचा-दःखाचा, आनंदाचा-नि-निराशेचा.... अधिकाधिक श्रिमंताचा, कमीतकमी गरीबांचा बेईमानाचा, अत्याचाराचा नि अन्यायावर मात करणारऱ्या न्यायाचाही । आगीत ढकलणारा हा समाज,  कधी अग्निदिव्यात तापलेल्या मनुष्याचा। दिवसा काळोखाचा  नि रात्री उजेडाचा । सुकाळात नास्तिकतेचा तर दुष्काळात आस्तिकतेचा । कधी जखमांवर मीठ चोळणारा तर कधी त्यावर मायेचे औषध लावणारा । माणसाला राक्षसात नि  राक्षसाला माणसात बदलणारा हा समाज। असा हा समाज कधी काटे टोचणारा तर कधी फुलांची म्रुदुता बहाल करणारा । दुःखद असुनही, सुखद ठरणारा नि मानवाला अस्तित्व देणारा हाच तो समाज।
नाते तुझे नि माझे तु हा असा अबोल,  मी ही अशी बोलकी... मी सततं होते व्यक्त,  पण तु मात्र नेहेमीच अव्यक्त..... माझे बोललेले शब्दही तुज पर्यंत पोचत नाही,  मला मात्र तुझे मनातले शब्दही उमजतात..... तु मला जपण्यासाठी सतत माझा अहंकार मोडतो,  पण मी तुला जपण्यासाठी तुझा अहंकार देखील जपते..... तु पहाटे पहाटे मिळणारी उर्जा आहेस,  तर मी संध्याकाळी थकुन आल्यावर मिळणारा विसावा आहे..... तु आहे यशानंतर मिळणारा आल्हाद,  पण मी आहे अपयशानंतर मिळणारं नाविन्यातील चैतन्य..... तु गुंफतो शब्दाना कविता करण्यासाठी,  मी गुंफते भावनांना कवितेत व्यक्त होण्यासाठी.....
   प्रेम 😍😊   प्रेम प्रेम हे काय असतं?  माझं तुझ्याशी आणि तुझ माझ्याशी  झालेल tie असतं.....  प्रेम प्रेम हे काय असतं?   Positive ला Negative कडे नि   Negative ला   positive   कडे आओढणारं attraction असतं......  प्रेम प्रेम हे काय असतं?  Strong acid नि Strong alkali   मिळूनं बनलेलं   Neurtral पाणी असतं....  प्रेम प्रेम हे काय असतं?  कधी forced frequency आणि  Natural frequency   मिळून निर्माण होणारा resonance असतो, तर कधी high   frequency आणि elastic body  मिळुन येणारी स्थिरता   असते......   प्रेम प्रेम हे काय असतं?    रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात लावलेला halogen चा मोठ्ठा        दिवा असतो.....    असं हे प्रेम, एक unbreakable nuclear fusion             असतं...जे harmful to everyone असतं.....😉
                 खोडकर मुले            कुचकुच बोलतात, अभिनय करतात            थोडा वेळ जाताच कडाडून हसतात            अशी हि मुलं का बरं करतात.......                         नेहेमीच त्याला कारण नसतं            फक्त हसायचं वा बोलायचं असतं            करायचं काय म्हणुन ओरडायच असतं            ह्या मुलांच मन काय बर सांगत?            आरडा-ओरडा दंगा मस्ती            उठते मग एखादी हस्ती            सुरू होते मजेदार कुस्ती....            ही मजा पाहुन मुली खुदुखुदु हसतात            त्यावर विरजण घालीत शिक्षिका येतात....            शिक्षिका करतात शिक्षा बरी            मार खावुन मुले बसतात घरी......
               माँर्डन देव              सात करोड़ सिंहासनाला       देव माँर्डन पावे त्याला...       माँर्डन देव म्हणे , भाव -भक्ति नको मला       केवळ वायुयान हवे फिरायला....       माँर्डन देव म्हणतो , "तुम मुझे सोना-धन दौलत दो, मै तुम्हे            आबादी सुख दुंगा..।"       गरिबाला कोण विचारे?         आता देवही त्याला विसरला रे...        रोकड्याच्या या काळात        देवही रोकड्याला बळी पडला रे....       माणुस गरिबीन तडपून मेला       कोणी गरिबीनं, तर कोणी बेरोजगारिनं गेला...       मात्र श्रीमंतांच्या या विश्वात       देवही लठ्ठ धनाने माँर्डन झाला...
      तु अशीच चालत रहा        तु अशीच अविरत चालत रहा...        विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करित रहा।        न थांबता न अडखळता...        यशाचे शिखर पदक्रांत करण्यास।        न डगमगता, न थकता...        अविश्रांत ......        समाजात स्वताःचे अस्तित्व निर्माण करण्यास।         चालत रहा तु अशीच....        आधार नसेल कुणाचा, फक्त तु चालत रहा...         आत्मविश्वासाने।         बघ...         यश,विजय, आनंद, सुख, सौख्य...         तुझ्या दारात उभे असतील।          म्हणुनच तु चालत रहा....
माझी प्रिय सखी... माझी प्रिय सखी मनस्वी, मुख तुझे तेजस्वी..... वत्कऋत्व तुझे ओजस्वी, आचार तुझे तपस्वी..... कार्य करते यशस्वी, गुणांनी अशी तु राजस्वी.... बघा ही राजकन्या चालली युराज्ञी व्हावया, परि म्हणे नाळ मातीशी नको तुटाया.... आई-बाबांचा, बहिण-भावाचा, आत्या-मावशीचा, काका-मामाचा नि सख्या सवंगड्यांचा लाभो तिला आजन्म संग..... प्रेमाचा व यशाचा प्रवाह वाहो तिज जिवनी अथांग, हिच माझी प्रार्थना अनंत.....
प्रिय बाबांस... कसे असेल तुझे प्रेम... कशी असेल ती गोडी..... बाबांच प्रेम द्यायला नशीबान केली मझ्यावर कुरघोडी.... बाबा काय असतात कधी कळलेच नाही मला... त्यांंच्या प्रेमाची आस धरुनी हा जीव माझा ओलावला... नाही म्हंटले कधी बाळ जपुन  पोळी भाज.... नाही कधी कुणी दिली ती मायेची थाप..... लग्नाची घडी आली तरी का नाही हो बाबा तुम्ही माझ्या सोबत.... हट्ट नाही केला , ना केला मी दंगा.... आईला त्रास होवू नये यासाठी केला समजदारीचा धंदा..... कधी कधी वाटतं बाबा तुम्ही यावं परत... म्हणावं बाळ काळजी करु नकोस... मी बघून घेईल सारं.... दुसर्याच क्षणी विचार येतो ते आता शक्य नाही... नि बाबांच प्रेम तुझ्या नशीबी नाही.....
आई आई तु जीवनाचा स्त्रोत.... तुझ्यामुळे माझे जीवन झाले आनंदाने ओतप्रोत.... तु मायेचा ओलावा... तु झाडाची सावली.... तुझ्यातच मला माझ्या जीवनाची गुरूकिल्ली गावली.... तु आभाळाची माया.... तुच मझा श्वास.... तुझ्या विश्वासामुळे करते मी आयुष्याचा संघर्ष बिंंधास्त...